Posts

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १९

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती   स्वामी चरित्र - भाग १९ 🌹 सांगली-सातारा जिल्ह्यातील वास्तव्य 🌹 आतापर्यंत श्रींनी मानसातील अनेक गूढार्थ लिहून ठेवलेले होते व अशा प्रकारची, मानसातील गूढार्थ प्रगट करणारी टीका 'मानसपीयूष' (अयोध्येहून) प्रसिद्ध झालेली श्रींच्या कानावर आली होती. पण चौकशी करूनही ही टीका मिळू शकली नाही. मात्र १९५० मध्ये 'मानसमणि' ह्या, रामचरितमानसावरील लेखनासच अग्रक्रम देणाऱ्या हिंदी मासिकाचा शोध लागला व त्याचे ग्राहक होण्याचा योग श्रींना आला.        याच वर्षी श्रींनी श्रीरामचरितमानसाची १०८ त्रिदिन पारायणे करण्याचे ठरवून त्याप्रमाणे पारायणास सुरूवात केली. साधारण पहाटे ६ ते ६।। ला वाचनास प्रारंभ होई आणि ११ ते ११।। पर्यंत वाचन पुरे होई. यावेळी प्रवास करावयाचा प्रसंग आलाच तरी त्या दिवशीचे वाचन संपल्यावर निघावे लागे व त्याच दिवशी रात्रीपर्यंत मुक्कामाचे स्थळ गाठावे लागे. या संकल्पाची पूर्ती ३१ आॅगस्ट १९५१ ला झाली.         यावेळी श्री. ना. भा. जोशी ह्यांनी दर्यापूर सोडले होते व ते इस्ल...

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १८

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १८ 🌹 बालरूप रामचंद्र पूर्ण उगवला 🌹         १९४७  मधील एप्रिल महिना होता. १२ तारीख, म्हणजे कदाचित् रामनवरात्रातील एखादा दिवस असण्याची शक्यता आहे. रोजच्याप्रमाणे श्रींचे प्रातःस्नान वगैरे झाल्यावर ध्यानास बसले असता व श्रींचा धनुर्धारी रूपाचा अभ्यास असताही, त्या दिवशी अचानक बालरूपाचे  दर्शन झाले. श्रीराम, बालरूप, बसलेले, नीलवर्ण, दैदीप्यमान, स्मितहास्य, गालावर खूप लाली, कानात कुंडले, अंगात पिवळे झबले, कपाळावर पिवळा गोरोचन टिळक (उर्ध्व), हृदयावर झबल्यावर मौक्तिक मणिहार, मधून मधून कमरेची रत्नजडित मेखला दिसत होती. याप्रमाणे ता. १२ ला हेच रूप सारखे दृष्टीसमोर येऊ लागले. या रूपाचे वर्णन करणारे काव्य 'बालरूप रामचंद्र पूर्ण उगवला' हे त्याचवेळी तयार झाले. ते १५/४/४७ रोजी वहीत लिहून ठेवलेले आढळले. तसेच ता. १५/४/४७ या दिवशी असेच मनात न आणताही अकल्पित श्री महालक्ष्मी चतुर्भुज, कमलावर पद्मासन घातलेली, सुवर्णसदृशकांती, रक्तवस्त्र परिधान केलेली, वर अभय, खड्ग, शूल धारण केलेली असे दर्शन झाले. या महिन्यात श...

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १७

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १७ 🌹 चले जाव आंदोलन 🌹 याप्रमाणे बघता बघता १९४५ साल संपले व १९४६ साल उजाडले. यावेळी भारत स्वतंत्र झालेला नव्हता. 'चले जाव' आंदोलन सुरूच होते. त्यातच हैद्राबादमध्ये रझाकारांनी अनन्वित अत्याचार सुरू केल्याच्या बातम्या सारख्या कानावर येऊन थडकू लागल्या. संन्यास घेण्यापूर्वी श्रींनी रामदासी संप्रदाय स्वीकारला होता व त्यांच्यावर श्रीसमर्थांचा व त्यांच्या वाङमयाचा फार खोल परिणाम झालेला होता. ते संस्कार यावेळी बळावून 'अहो हिंदूंनो, संघ संपन्न - व्हावे.' 'हिंदूंनो डोळे उघडा' 'दूर करी शीघ्र जाच हा' 'श्रीसमर्थ प्रार्थनाष्टक' यासारखी काव्ये निर्माण झाली. यातील काही तत्कालीन 'केसरी' सारख्या वृत्तपत्रातून प्रसिद्धही झाली. 🌹 गुरूदर्शनाची ओढ 🌹 याकाळात श्रींचे वास्तव्य जरी मुख्यतः चासकमान येथे होते, तरी मनात जर श्रीगुरूमहाराजांच्या दर्शनाची इच्छा उद्भवली तर पहाटेच कुणालाही न विचारता नित्यक्रम आवरला की चंबू गबाळे उचलून सरळ आळ्याच्या दिशेने चालू लागत. संन्यास घेतल्यापासून पैशाला स...

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १६

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १६ 🌹 गुरूचरणी अनुवादनमानस अर्पण 🌹 लगेचच श्री आळ्याच्या महाराजांना पत्र लिहून याप्रमाणे अनुवाद लिहून झाल्याचे कळविले व दर्शनाविषयी अनुज्ञा मागितली. ता. ६/११/४५ व ७/११/४५ या दोन दिवसांत श्रीरामाची, बाबा गंगादासांची व श्रीरामायणाची वगैरे विविध आरत्या तयार झाल्या व तोपर्यंत श्रींची अनुज्ञा मिळाल्याने श्रीमहाराजांचे दर्शनास श्रींचे जाणे झाले.        श्रींनी श्री आळ्याच्या महाराजांना मराठी रामचरितमानस (हस्तलिखित) वाचून दाखविण्यास सुरूवात केली. ते जसजसे वाचू लागले, तसतसे श्री आळ्याच्या महाराजांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. काही ठिकाणी तर ते अगदी हुंदके देऊन ओक्साबोक्शी रडूच लागले. इकडे श्रींचाही वाचताना कंठ भरून येऊन, डोळ्यांतून अश्रुधारा अशी कठीण अवस्था होऊ लागली. शेवटी अशा रीतीने मधूनच थांबत, तो अनुवाद श्रीमहाराजांना अधून मधून वाचून दाखविला व त्यांचा अभिप्राय व आशीर्वाद मागितला. तेव्हा असा असा लिहून आणा म्हणून आज्ञा झाली व त्याप्रमाणे लिहून आल्यावर श्री आळ्याच्या महाराजांनी खाली सही केली. तो अभिप...

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १५

Image
प . पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १५      🌹 आमु ची चिंता रघुरायाला 🌹 असो. याप्रमाणे फाल्गुनात (१९४५ मार्च असावा) याप्रमाणे या शिष्यांमुळे श्रींना हे सर्व क्लेश सोसावे लागले. तब्येत जरा सुधारली न सुधारली तोच चैत्रात पुन्हा मुदतीचा ताप आला. यावेळी तर नाडीही लागेना अशी अवस्था एकवेळ आली होती. अर्थात् तरी पूर्ण शुद्धीवर होते व 'रामास आमची सर्व चिंता आहे. तुम्ही काळजी करू नका किंवा कुणाला सेवेसाठीही बोलवू नका. स्वस्थ पडू द्या, फार तर प्यायला पाणी तेवढे द्या,' असे सांगितले.           खरेतर समाधीचीच वेळ आली होती. पण अद्याप श्रीबाबागंगादासांचा आशीर्वाद खरा व्हावयाचा होता; म्हणूनच की काय श्रींना बरे वाटले. मध्यंतरी दोन-तीन महिने गेले, तोवर श्रींची तब्येतही पूर्ववत् उत्तम झाली.     🌹 अनिवार काव्यस्फूर्ती 🌹 श्रावण महिना लागला आणि श्रींना अनिवार काव्यस्फूर्ती होऊ लागली. 'सांगतसे मज तो रघुराणा । मम आज्ञा ऐके प्रज्ञाना । (१०-८-४५) सत्वर करण्या घे तूं हातीं । रामचरित मानस रचना ती ।।१।। अशी श्रीरामाची आज्ञाच झाल्...

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र – भाग १४

Image
प. पू. श्री  प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -  भाग १४ ...........गुरुद्रोही म्हणून मेला          यानंतर श्रींच्या असे दृष्टीस आले की, तो तीर्थयात्रेस न जाता जुन्नर येथेच राहिला असून आपणास शरण येण्यापूर्वीच जारण- मारणादि शिकला होता. तेव्हा मार्गशीर्षात त्यास जुन्नर येथे परत बजावले की, जुन्नर सोडून पूर्वसंकल्पाप्रमाणे तीर्थयात्रेस जा, नाहीतर येथे कल्याण दिसत नाही ! पण सर्व प्रकारे अनाचारी असल्याने त्याने प्रत्यक्ष सद्गुरुवरच मारणाचा प्रयोग केला.        त्यावेळी चास-कमानलाच श्रींचा मुक्काम होता. एकाएकी रक्ताचे जुलाब होऊ लागले व प्रकृती गंभीर झाली. त्यावेळी श्रींनी मुठभर तुळशीचा पाला वाटला व त्याचा रस फक्त सेवन केला व काही मंत्रोच्चार केला. इतकी अवस्था होती तरी नित्य नियमात खंड पडत नव्हता. पण शेवटी झाले असे की, प्रत्यक्ष ब्रम्हनिष्ठ अशा गुरुवरच केलेला मारणाचा प्रयोग त्या हरीभट्टावरच उलटला. व तो फाल्गुन वद्य ११ ला मढ , तालुका जुन्नर येथे मरण पावला !! त्याची क्रियाही कोणी केली नाही ! श्रींनी हे सर्व ऐकल्यावर...

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र – भाग १३

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १३ हरीभट शिष्यभावाने आला १९४५ साल होते.मार्च महिना सुरु झाला होता. उन्हाळ्याची सुरुवात होती. एक दिवस एक कानडी आप्पा श्रींच्या परिचित अशा एका सज्जनाची चिट्ठी घेऊन चासला येऊन ठेपला. जवळ लोट,भांडे,सोवळे,पांघरूण वैगेरे काहीच नाही. श्रींच्या पुढे येऊन प्रणाम करून ‘हरीभट' म्हणून नाव सांगितले. ‘कुठले राहणार?’ विचारता , सागर,जिल्हा शिमोगा म्हणून उत्तर दिले. वय केवळ १९ वर्षांचे !                                                                                                               ...